Join WhatsApp group

Ads

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये: जयंत मसने

By Sarkarmzanews

May 22, 2025 7:29 pm

Ads

दिनांक २२ – अकोला – भारतीय सेनेचा मनोबल तोडण्याचं काम विजय , वट्टीवार, कर्नाटकामधील काँग्रेसने ते करीत असताना स्वतःला पुरोगामी म्हणून कार्य करणारे सोशल मीडिया मधील व्यक्ती त्यांच्यावर एक शब्दही बोलत नाही केवळ भाजपावर टीका करतात यापासून अशा प्रवृत्ती पासून सावध राहण्याची गरज आहे या देशांमध्ये जय चंदा मुळे मुघलशाही ब्रिटिश शासन आले त्यामुळे जयचंदापासून सावध राहून देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी भारतीय सेना आणि भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे या देशाला भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाष चंद्र बोस महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांमुळे देश स्वातंत्र्य मिळाला आहे याला कायम ठेवून देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सबका साथ सबका विकास सबका प्रयास सारखं नेतृत्व व देशाचा संरक्षण करणारे जगाला आपली प्रचिती दाखवणाऱ्या सैनिकाचे मनोबल गुंतवण्याची गरज आहे परंतु राहुल गांधी व त्यांची टीम सातत्याने देशांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलत आहे अशा प्रवृत्ती पासून सावध राहण्याची गरज आहे अशी प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी केले.


शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रभू रामचंद्राची विशेष आराधना करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्याची प्रार्थना अकोला महानगर पूर्व मंडळाच्या वतीने करण्यात येऊन संदीप गावंडे यांच्या नेतृत्वात यात्रा तिरंगा यात्रा काढून सैनिकांचा आशीर्वाद सैनिकांना असो माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेऊन वाटचाल करण्यात आली बिर्ला राम मंदिर ते विश्वकर्मा मंदिर पर्यंत यात्रा काढण्यात आली. नवभारत निर्माण मध्ये विश्वकर्मा यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही यात्रा यशस्वी ठरेल असा विश्वास भाजपा महानगर सरचिटणीस एडवोकेट देवाशिष काकड यांनी यावेळी व्यक्त केला.


आज अकोला पूर्व मंडळात ऑपरेशन सिंदूर मध्ये देशातील सैनिकांनी केलेल्या शौर्याबाबत तिरंगा यात्रा मोटर सायकल बाईक रॅलीचे आयोजन नामदार श्री आकाश भाऊ फुंडकर (पालकमंत्री अकोला), प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष श्री संतोष भाऊ शिवरकर, श्री विजयभाऊ अग्रवाल, श्री किशोरभाऊ मांगटे पाटील तसेच माजी सैनिक अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व महानगर अध्यक्ष जयंत भाऊ मसने यांच्या नेतृत्वात बाईक रॅली संपन्न झाली.

श्रीराम मंदिर बिर्ला कॉलनी ते लहान उमरी- विश्वकर्मा मंदिर मोठी उमरी येथे समारोप करण्यात आला.यावेळी महानगर सरचिटणीस देवाशिष भाऊ काकड, पूर्व मंडळ अध्यक्ष संदीप भाऊ गावंडे, पूर्व मंडळ सरचिटणीस उमेश श्रीवास्तव, विठ्ठल देशमुख, केशव हेडा, प्रशांत अवचार, शिवलाल इंगळे, जितेन देशमुख, ध्रुव खुणे, रवी यादव, अनिल नावकार, अजय शर्मा, व आदीं महिला वर्ग व तरुण वर्ग, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!