Join WhatsApp group

Ads

संवाद आणि संवेदना जिवंत असली पाहिजे – बच्चू कडू

By Sarkarmzanews

November 13, 2024 12:30 pm

Ads

प्रेमराज शर्मा – १३ नोव्हें.२४ – प्रचाराचा धडाका जास्त टोकावर आला असून प्रत्येक पक्ष आप आपल्या उमेदवारासाठी प्रचार सभा जिथे तिथे आयोजित करत आहे, त्या मध्ये प्रत्येक बाजूने उमेदवारचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

काल बर्शिटाकळी येथे रवी राठीचा प्रचारासाठी बच्चू कडू यांनी हजेरी लावली असून आपल्या मार्मिक भाषणातून त्यांनी जनतेला मतदान का व कसे करावे मतदान करण्यापूर्वी कोणकोणत्या बाजूने विचार करावे सांगितले.

थोडक्यात जाणून घ्या

निवडणुकीला जनतेने गंभीर पणे घेण्याची गरज आहे जात धर्मचा विचार न करता मतदान करावे.

मतदान करण्यासाठी ५ मिनिट लागतात दिवस नाही.

आपला एक मत हा ब्रम्हास्त्र आहे विचार पूर्वक मत नाही टाकला तर आपल्या घरात येऊन याचा स्फोट होईल.

राजकारणाचा पलीकडे जाऊन प्रहार ने दिव्यांग मंत्रालय सुरु करण्यासाठी सरकारला भाग पाडले.

आजपण शासकिय रुग्नालयात एक पंलगावर दोन रुग्ण इलाज घेतात.

महाराष्ट्रात समानतेच शिक्षण नाही.

मजुराचे हात रिकामे आहे, महागाई वादात चालली आहे मजूर साठी कोणता कायदा नाही.

प्रहार साठी रयत महत्वाची खुर्ची नाही.

मागील १५ वर्षात जेवढा विकास झाला त्या मध्ये भ्रष्टाचार किती झाला याचा विचार जनतेने करावा, लुट आणि लुटनारे लक्षात असू द्या

या सोबत रवी राठी यांनी पण आपले रोष भाजप व राष्ट्रवादी पक्षा वर चांगलेच काढले.

अंदर कि बातसभा झाल्यानंतर राष्ट्रवादी श.प.गट बर्शिटाकळी मधल्या काही नेत्यांची रवी राठी यांचा सोबत एक गुप्त बैठक झाली असून काही तरी खिचडी शिजल्याचे समजते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!