Join WhatsApp group

Ads

-

सध्याचा पाऊस शेतकऱ्यांसाठी संजीवनी, पण नागरिकांसाठी उद्भवू शकतो पाणीटंचाईचा धोका

By Sarkarmzanews

July 26, 2025 11:31 pm

Ads

मुर्तिजापूर |२७ जुलै २०२५|✒️ प्रेमराज शर्मा

यावर्षीच्या मॉन्सूनने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र भविष्यातील पाणीटंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुलै अखेर असूनही जिल्ह्यातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही.शेतकऱ्यांसाठी सध्याचा पाऊस खरीप हंगामासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

उशिरा का होईना, पण झालेल्या पावसामुळे बऱ्याच भागांत शेतीची कामे पूर्ण झाली असून बियाणे पेरण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. विशेषतः सोयाबीन,भात इत्यादी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पण दुसऱ्या बाजूला, धरणांमधील जलसाठा तुलनेने कमी असून भविष्यातील पाणीपुरवठ्यास अडथळा येऊ शकतो. सध्या अनेक लहान-मोठ्या धरणांची पातळी सरासरीच्या तुलनेत 30 ते 40 टक्क्यांपर्यंतच पोहोचली आहे.

जर पुढील काही दिवसांत समाधानकारक पर्जन्यमान नोंदवले गेले नाही, तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तसेच शासन यंत्रणांनी तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

आजच नियोजन करून संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जलसंधारण, टँकरद्वारे पुरवठा, शहरी भागात पाणीकपात अशा गोष्टींची तयारी ठेवावी लागेल.

त्याचप्रमाणे, दीर्घकालीन उपाययोजना म्हणून नदीजोड प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा समतोल साधण्यासाठी आणि कोरडवाहू भागांना मदत करण्यासाठी ही प्रकल्पं उपयुक्त ठरू शकतात.

सध्या केवळ कागदावर असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरविण्याची वेळ आली आहे.सध्या ग्रामीण भागात पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी शहरांमध्ये आणि औद्योगिक भागांमध्ये पाण्याच्या गरजा अधिक आहेत. त्यामुळे पाणी नियोजन अधिक काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. जलसंपत्तीचा योग्य उपयोग, पुनर्वापर आणि जनजागृती हेदेखील या समस्येवरचे प्रभावी उपाय ठरू शकतात.

शेवटी एवढेच म्हणावे लागेल की, पावसाची प्रतीक्षा करत न बसता भविष्यात येणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिकांनी मिळून सज्ज राहणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!