Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूर नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत : दोन युवा विरुद्ध एक जेष्ठ नेतृत्वाची थेट टक्कर

By Sarkarmzanews

November 27, 2025 12:30 pm

Ads

मूर्तिजापूर : दिनांक २७ : नगरपरिषद निवडणुकीत यंदा शहरात तिरंगी आणि चुरशीची लढत रंगणार आहे. भाजप, शिवसेना (उबाठा गट) आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मैदानात प्रचार सुरु केला असताच शहरातील राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे.
विशेष म्हणजे, या लढतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन युवा उमेदवार विरुद्ध एक जेष्ठ अनुभवी उमेदवार असा रोमहर्षक संघर्ष दिसत आहे.


भाजपचे हर्षल साबळे : आमदारांचे शिष्य आणि तरुणाईचे नेतृत्व

भाजपने हर्षल साबळे यांच्यावर विश्वास टाकत नगराध्यक्ष पदाची धुरा युवा नेतृत्वाकडे सोपवली आहे.
हर्षल साबळे हे आमदार हरीश पिंपळे यांचे शिष्य, संघटन कौशल्य, आक्रमक नेतृत्व आणि तरुणांना एकत्र खेचणारा उत्साही चेहरा म्हणून ओळखले जातात.
भाजपने “युवा नेतृत्व = नवा शहर विकास” असा स्पष्ट संदेश देत त्यांची उमेदवारी जोरात पुढे नेली आहे.


वंचित बहुजन आघाडीचे शेख इम्रान : बहुजन-मुस्लिम युवकांचे प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीकडून शेख इम्रान हे दुसरे युवा उमेदवार मैदानात.
शेख इम्रान हे बहुजन आणि मुस्लिम समाजाचा गणिती आणि प्रभावी मते खेचणारे युवा नेतृत्व आहे.
सामाजिक मुद्द्यांवर त्यांचा आवाज ठोस असून तरुण, श्रमिक आणि वंचित समुदायांत त्यांचे बळ चांगले मानले जाते.
युवा जोश आणि सामाजिक समीकरणे यांच्या आधारावर वंचित आघाडी त्यांना पुढे करत आहे.


शिवसेनेचे विनायक गुल्हाने : जेष्ठ अनुभवाचे वजनदार नेतृत्व

तिसऱ्या बाजूला शिवसेना (शिंदे गट) तर्फे विनायक गुल्हाने मैदानात उतरत आहेत.
गुल्हाने हे जेष्ठ, अनुभवी, आणि मूर्तिजापूरच्या गल्लीबोळांत दीर्घकाळ काम करणारे राजकारणी म्हणून परिचित.
शहराचे राजकारण, प्रभागांचे मुद्दे, पायाभूत अडचणी यांची त्यांना सखोल जाण असल्याने जेष्ठ नेतृत्वाचा त्यांचा अनुभव युवा उमेदवारांसमोर एक गंभीर आव्हान निर्माण करतो.


दोन युवा vs एक जेष्ठ — कोण भारी? तिरंगी लढतीचे महत्त्वाचे समीकरण

हर्षल साबळे (भाजप) – ऊर्जा, आमदारांचा सपोर्ट

शेख इम्रान (वंचित आघाडी) – बहुजन + मुस्लिम मजबूत सामाजिक समीकरण

विनायक गुल्हाने (उबाठा शिवसेना) – परिपक्व, अनुभवी, दीर्घ राजकीय कामाचा ठसा

यामुळे नगराध्यक्ष पदाची ही लढत आता केवळ तिरंगी नाही, तर युवा जोश विरुद्ध जेष्ठ अनुभव याची थेट टक्कर बनली आहे.


मतदारांच्या मनात मोठा प्रश्न : शहराला नवा युवा चेहरा हवे का, की अनुभवी हात?

एकीकडे युवा उमेदवारांच्या माध्यमातून शहरात परिवर्तन, नवे विचार आणि नव्या धाटणीचे प्रशासन येण्याची अपेक्षा आहे.
तर दुसरीकडे अनुभवी नेतृत्वाचा स्थिर, समतोल आणि जाणिवेने चालणारा कारभार हाच शहरासाठी योग्य, असे मतदारांचे मत.

म्हणूनच यंदाची लढत उत्सुकतेच्या शिखरावर—
युवा नेतृत्व उदयास येणार की जेष्ठ अनुभव पुन्हा एकदा विजयाचा झेंडा उभारणार?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!