Join WhatsApp group

महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल : आ. हरिष पिंपळे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 11 : मूर्तिजापूर : मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत महत्त्वाचे विचार मांडले आहेत. त्यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.

विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य ठेवून, राज्यात विकासकामांना चालना देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुर्दीमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना अधिक बळ मिळणार असून याचा थेट फायदा राज्याच्या जनतेला होईल. ‘विदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे.

सुमारे १५ लाख ७२ हजार ६५४ कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होत आहे, ज्यामुळे लाखो रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी आणि राज्याच्या सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सुमारे ५ हजारकोटी रुपये किमतीच्या कालवे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

आमदार हरीश पिंपळे यांनी राज्यातील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

या योजनेमुळे पाणी उपलब्धता आणि सिंचन क्षमता वाढवून कृषी उत्पादनात सुधारणा होईल.आमदार पिंपळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले, कारण त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात देशी व वितरण प्रणालीतील सुधारणांच्या महाराष्ट्राच्या जनतेने या कामांना नाबार्ड अर्थ सहाय्याच्या पहिल्या टप्यात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील विकासाच्या प्रवासात पूर्ण पाठिंबा द्यावा, असे आवाहनही आमदार हरीश पिंपळे यांनी केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!